पाञ्चजन्य फाउंडेशन ची सुरुवात झाली ती मुळात या प्रकल्पामुळे. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची समाधी पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रात आहे. ही समाधी साधारण ३ वर्षांपूर्वीपर्यंत दुरावस्थेत होती.
झुंज प्रतिष्ठान मार्फत या समाधी परिसरात काही स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेपलिकडे जाऊन समाधीचे संवर्धन करण्यात यावे यासाठी पाञ्चजन्य फाउंडेशन तर्फे कसबा विधानसभेच्या तत्कालीन आमदार मुक्ताताई टिळल यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुक्ताताईंच्या प्रयत्नांमुळे पुणे महानगरपालिकेने या समाधीच्या संवर्धन कार्याला सुरुवात केली. परंतु प्रशासकीय अडचणींमुळे हे कार्य अजूनही पूर्णत्वाला गेलेले नाही.
श्रीमंत नानासाहेबांचे मराठ्यांच्या स्वराज्यासाठी योगदान अद्वितीय आहे. पुण्यास शहराचा दर्जा मिळाला तो नानासाहेबांमुळे. नानासाहेबांना आधुनिक पुण्याचे संस्थापक म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच या समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार होत नाही तो पर्यंत पाञ्चजन्य फाउंडेशन अविरतपणे कार्य करत राहील.
’A Hindu in Oxford’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
कु. रश्मि सामंत यांची जगप्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. परंतु केवळ भारतीय हिंदू असल्यामुळे त्यांना इस्लामी व भारत/हिंदू विरोधी विचारधारेसाठी कार्य करणाऱ्यांकडून प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास देण्यात आली होता. या समाजकंटाकांकडून रश्मि सामंत यांना हत्येची धमकी ही देण्यात आली होती. विद्यापीठातील एका प्राध्यापकाने तर “Oxford Students are not ready for a Hindu President” अशाप्रकारची टिप्पणी करुन अनेकांची माथी भडकवण्यात आली होती. नक्की काय-काय घडलं व या सगळ्यावर रश्मि सामंत न कशी मात केली याचे अनुभव कथन ‘A Hindu in Oxford’ या पुस्तकात केले गेले आहे.
संवाद माध्यम सेवा, पुणे (विश्व संवाद केंद्र) व पाञ्चजन्य फाउंडेशन तर्फे या पुस्तकाचा पुणे येथील प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे माजी खासदार व ज्येष्ठ विचारवंत प्रदीप दादा रावत यांच्या हस्ते व प्रसिद्ध स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
निनाद इतिहासाचा
स्व. निनादराव बेडेकर म्हणजे जणू काही इतिहासाचा चालता-बोलता कोशच! इतिहास संशोधक, लेखक, व्याख्याते, चित्रकार अशा अनेक पैलूंनी समृद्ध असलेल्या निनादरावांकडून जाणते-अजाणतेपणी अनेकांनी इतिहासाचे धडे गिरवले. एका विशिष्ट, अत्यंत रोचक शैलीत इतिहास मांडण्याची कला अगदी मोजक्या महाराष्ट्रसारस्वतांमध्ये होती, अन् निनादराव त्यापैकी एक होते.
या वर्षी, स्व. निनादरावांचे ९ वे पुण्यस्मरण होते. यानिमित्तानेच, त्यांच्या शिष्यमंडळींकडून आणि चाहत्यांकडून एक लहानशी आदरांजली म्हणून निनादरावांच्या आठवणी, इतिहास-विषयक चर्चासत्र आणि गप्पांचा एक अनौपचारिक कार्यक्रम दि. ११ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहोत. निनादरावांसारख्या इतिहास पंडिताकडून जे जे कानी पडत गेलं त्याची उजळणी म्हणून, नव्या पिढीपर्यंत ते पोहोचावं म्हणून हा सारा प्रपंच इतिहासाच्या पाऊलखुणा, पाञ्चजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट या तीन संस्थांनी मिळून मांडला होता.
किल्ले सिंहगड येथे सामूहिक रामरक्षा पठणाचे आयोजन
पौष शु. १२, शके १९४५ अर्थात २२ जानेवारी, २०२४ रोजी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्रांची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाली. या मंगल प्रसंगाचा आनंद सर्व रामभक्तांसोबत व्यक्त करण्यासाठी पाञ्चजन्य फाउंडेशन तर्फे २१ जानेवारी, २०२४ रोजी किल्ले सिंहगडावर रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
इ.स. १६४९ साली भारत भ्रमण करुन आल्यानंतर समर्थ रामदासस्वामी यांनी चाफळ येथे राम मंदिराची स्थापना करत तेथे राम नवमी चा महोत्सव सुरु केला. पुढे इ.स. १६७२ पासून स्वराज्य संस्थापक हैंदव धर्म-उद्धारक छत्रपती शिवरायांनी समर्थांच्या ह्याच राम नवमी महोत्सवाची जबाबदारी घेत हा महोत्सव अविरतपणे चालवला व वाढवला. धर्मवीर संभाजीराजे आणि स्थिरबुद्धि राजाराम छत्रपती यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच चाफळ च्या श्री रघुनाथाची सेवा केली. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवराय - प्रभु श्री रामचंद्राच्या या दोन थोर भक्तांचे स्मरण करत छत्रपतींच्या स्वराज्याचील अत्यंत महत्तव असलेल्या किल्ले सिंहगडावर अमृतेश्वर मंदिरात हा रामरक्षा पठणाचा कार्यक्रम पार पडला.
रक्तदान शिबीर
जुलै महिन्यात पुण्यातील अचानकपणे उद्भवलेली रक्ताची कमतरता लक्षात घेऊन पाञ्चजन्य फाउंडेशन आणि जनकल्याण रक्तकेंद्र यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत पुणेकरांना स्वेच्छा रक्तदानातो आव्हान केले होते. जनता बँकेचे सीईओ श्री. जगदीशजी कश्यप यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दीपोत्सव
पाञ्चजन्य फाउंडेशन ची सुरुवात झाली ती श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीच्यजीर्णोद्धारापासून. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करत आपला जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर मांडणे आम्हाला आपले कर्तव्य वाटते. गेल्या ३ वर्षांपासून पाञ्चजन्य फाउंडेशन तर्फे दिवाळीमध्ये समाधी परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले जात.
आपली दिवाळी बोर्डरवली
पाञ्चजन्य फाउंडेशन, प्रवर्तन फाउंडेशन व रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट - या तीन संस्थांनी कश्मीर येथील LOC वर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवला होता. प्रवर्तन फाउंडेशन चे निनाद पटवर्धन व योगेश जोशी पुण्याहून हा फराळ घेऊन कश्मीर ला गेले होते. त्यांनी दिवाळी Machil Valley मध्ये १४८०० फूट Altitude वर असलेल्या ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या परिसरात या श्रीमंतयोगी युगपुरुषाच्या छत्रछायेखाली भारतीय लष्कारासोबतच साजरी केली.
‘श्री राजारामछत्रपतींचे पत्रे’ – प्रकाशन सोहळा
इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याकरिता ससंदर्भ इतिहास जनतेसमोर मांडला गेला पाहिजे. हेच ध्येय समोर ठेवून पाञ्चजन्य फाउंडेशन व इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था अनेक उपक्रम राबवत असतात. या वर्षी युवा इतिहासकार प्रथमेश खामकर लिखित ‘श्रीराजारामछत्रपतींचे पत्रे’ या संदर्भग्रंथाचेप्रकाशन करण्यात आले.
शनिवारवाडा वारसा सहल
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. परंतु १८ व्या शतकात अनेक वर्ष पुणे हे हिंदुस्थाच्या राजकारणाचे केंद्रबिंदु होते. इंग्रजांनी भारत हा मोगलांकडून नव्हे तर मराठ्यांकडून घेतला हे सत्य तर आपण जाणतोच. मोगलांची सत्ता उल्थवून लावायचे जे कार्य स्वराज्याच्या स्थापनेपासून श्रीमन्छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभले होते ते त्यांच्या वैचारिक वारसांनी पुढे ही सुरु ठेवले होते. ज्या शनिवारवाड्यातून एकेकाळी दिल्लीचे राजकारण चालत होते अशा वास्तुची ससंदर्भ माहिती इतिहास प्रेमींपर्यंत पोहोचवण्याचे मानस धरुन पाञ्चजन्य फाउंडेशन व इतिहासाच्या पाऊलखुणा बहुद्देशीय संस्था या दोन संस्थांनी संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ दुर्गअभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारवाडा वारसा सहलीचे आयोजन केले होते. या उपक्रमाला इतिहास प्रेमी पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.